महाकालेश्वर

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे प्रचंड आध्यात्मिक महत्त्व आहे. हे ज्योतिर्लिंग मध्य भारतातील लोकप्रिय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की हे मंदिर श्रीकर या पाच वर्षांच्या मुलाने बांधले आहे. असे म्हटले जाते की श्रीकर उज्जैनचा राजा चंद्रसेनच्या भक्तीने खूप प्रेरित झाले होते. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भारताच्या सात मुक्ती स्थळांपैकी एक आहे.


महाकालेश्वर उज्जैन दर्शन वेळ

महाकालेश्वर मंदिर सकाळी 4 ते रात्री 11 पर्यंत खुले राहते. पर्यटक सकाळी 8 ते 10 पर्यंत महाकालेश्वर ज्योतिर्लिंगला भेट देऊ शकतात, त्यानंतर 10:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत. यानंतर, शेवटचे दर्शन येथे संध्याकाळी 6 ते 7 आणि नंतर रात्री 8 ते 11 पर्यंत करता येते.

महाकालेश्वराची भस्म आरती हे मुख्य आकर्षण आहे. ही आरती फक्त भाग्यवानांनाच पाहायला मिळते. भस्म आरती काउंटर मंदिराच्या मुख्य गेटवरच बांधलेले आहे. येथे सकाळी 10:30 ते 12 पर्यंत आधार कार्ड दाखवून एक फॉर्म घ्यावा लागेल.

उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले ‘महाकालेश्वर मंदिर’ भगवान महादेवाच्या भक्तांसाठी एक विशेष तीर्थक्षेत्र आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन या पुरातन शहरातील ‘महाकालेश्वर मंदिर’ तिथल्या भस्म आरतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले ‘महाकालेश्वर मंदिर’ भगवान महादेवाच्या भक्तांसाठी एक विशेष तीर्थक्षेत्र आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन या पुरातन शहरातील ‘महाकालेश्वर मंदिर’ तिथल्या भस्म आरतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ही आरती दररोज पहाटे 4 वाजता भगवान महाकालेश्वरची आराधना करण्यासाठी केली जाते. हे एक ज्योतिर्लिंग स्थान आहे. जे प्रकाशाचे दिव्य रूप मानले जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग देशातील 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

भस्म आरती म्हणजे काय?

भस्म आरती हा आरतीचा एक विशेष प्रकार आहे, जी उज्जैनमध्ये ब्रह्म मुहूर्ताच्या (सूर्योदय होण्याच्या दोन तास आधी) दरम्यान केली जाते. पुजारी पवित्र मंत्रांचे पठण करताना महादेवाला पवित्र राख (भस्म) अर्पण करतात. आरती करत असताना असे वातावरण तयार होते, जणू उपस्थित भाविकांना आपल्या समोर भगवंताचे अस्तित्व असल्याचे जाणवते.

भस्म आरतीचे महत्त्व काय आहे?

धार्मिक मान्यतानुसार भगवान शिवाला ‘काल’ किंवा ‘मृत्यूचे स्वामी’ मानले जातात. याच कारणास्तव, ‘शव’मधून ‘शिवा’ हे नाव निर्माण केले गेले आहे. महादेव यांच्या म्हणण्यानुसार, शरीर नश्वर आहे आणि ते एक दिवस राख बनणार आहे आणि शिवाशिवाय कोणाचे काळावर नियंत्रण नाही. म्हणून भगवान शिव यांची या पवित्र राखेने पूजा केली जाते.

भस्म आरती बद्दलच्या मान्यता…

– असे म्हणतात की, भगवान शिव यांना जागृत करण्यासाठी भस्म आरती केली जाते, म्हणून ही आरती पहाटे 4 वाजता केली जाते.

– सध्याच्या काळात महाकालेश्वराची भस्म आरती गायीच्या शेअनाच्या गोवऱ्या, शमी, पिंपळ, पलाश, वड, अमलताश आणि बोराची लाकडे जाळून त्यातून तयार झालेल्या राखेतून केली जाते.

भस्म आरतीचे रहस्य

पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की, पुरातन काळात उज्जैनवर महाराज चंद्रसेन राज्य करत होते, जे भगवान शिवाचे परमभक्त होते. केवळ चंद्रसेनच नव्हे तर, उज्जैनच्या लोकांनीही भगवान शिवाची खूप उपासना केली. एकदा रिपुदमन राजाने चंद्रसेनच्या राजवाड्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे प्रजेचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत लोकांना भगवान शिवाची आठवण आली. त्यावेळी भगवान शिव स्वत: तेथे प्रकट झाले आणि त्या दुष्ट राक्षसाचा वध केला. यानंतर, शिवाने राक्षसांच्या राखेतून स्वतःचा शृंगार केला आणि ते उज्जैनमध्ये कायमचे स्थायिक झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, त्या जागेचे नाव महाकालेश्वर असेल आणि यामुळेच येथे भस्म आरती सुरू झाली.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्यप्रदेशातील उज्जैनमधील हे मंदीर अत्यंत प्रसिद्ध आहे. रूद्र सागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदीर अप्रतिम असून भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त आस्थेचे ठिकाण म्हणूनही याची ओळख आहे. पार्वती, कार्तिकेय आणि गणेशाच्याही प्रतिमा येथे आहेत. इथे बनविण्यात आलेले नागचंद्रेश्वर मंदिराचे कपाट केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडण्यात येते असे म्हटले जाते. महाकवी कालिदासांनी या मंदिराची प्रशंसा केल्याचे उल्लेख आहेत. तसंच या मंदिरात पूजा केल्यास, स्वप्नपूर्ती होते असाही समज आहे कारण या ठिकाणी माता स्वप्नेश्वरीचा वास आहे असे म्हटले जाते. 

शिवपुराणानुसार एकदा ब्रम्हा, विष्णू आणइ महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना शिवाच्या मनात विष्णू आणि ब्रम्हदेवाची परीक्षा घ्यावी असे आले. त्यांनी दोघांनाही प्रकाशाचा अंत कुठे आहे हे शोधण्यास सांगितले. त्यासाठी शिवशंकराने एक मोठा स्तंभ उभारला. दोघांनीही शोध घेतला पण अखेर थकून विष्णूने हार मानली तर ब्रम्हदेवाने टोक सापडले असे खोटे सांगितले. खोटेपणामुळे शिवशंकरानी ब्रम्हदेवाला कोणीही कधीच तुम्हाला पूजणार नाही असा शाप दिला. तेव्हा ब्रम्हदेवानी माफी मागितली आणि शिवाची विनवणी करत त्या स्तंभात विराजमान व्हायला सांगितले. हाच स्तंभ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. स्तंभाचे रूपांतर लिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कसे पोहचाल

जवळचे रेल्वे स्टेशन – उज्जैन
विमानतळ – उज्जैन
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग(Omkareshwar jyotirling)